
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके नागपूर येथे पोहोचले. यावेळी त्यांनी नुकत्याच घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देताना हा हल्ला आवाज दाबण्याचा आणि मूळ मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली आणि एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. शांततामय आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.