
भिवंडीतील गंगावाडी परिसरातील कोहिनूर इमारत दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. दुरुस्तीपलीकडे धोकादायक घोषित करण्यात आलेल्या या इमारतीत महापालिकेची परवानगी न घेता दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक यंत्रणांनी रात्रभर बचावकार्य केले. आतापर्यंत 9 जणांचा जीव गेला असून 3 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परवानगीशिवाय दुरुस्ती केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि मालकाविरोधात कायदेशीर कारवाईचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणावर खासदारांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.