
दिल्ली सरकारच्या बकरीद संदर्भातील निर्देशांवर आणि पश्चिम बंगालमधील जनावरांच्या कत्तलीवरील निर्बंधांवर शिवसेना UBT चे प्रवक्ते आनंद दुबे यांनी प्रतिक्रिया दिली. धार्मिक स्वातंत्र्य, मुस्लिम समाजाच्या भावना आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत त्यांनी सरकारवर टीका केली. वंदे मातरम सक्ती, मदरशांवरील नियम आणि बकरीदच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादांवरही त्यांनी भूमिका मांडली. समाजात तणाव निर्माण करणारी वक्तव्ये टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं.