
विधानसभेतील पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मृत्यू प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली. सध्या सीआयडी आणि एआयबी या दोन्ही स्तरांवर तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एआयबीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि सीबीआयच्या भूमिकेबाबत निर्णय होऊ शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्लॅक बॉक्ससह आवश्यक तांत्रिक माहिती डाउनलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम अहवाल जानेवारीपूर्वी अपेक्षित असल्याची माहिती केंद्र सरकारकडून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. अहवाल आल्यानंतर सत्य बाहेर आणण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व कारवाई करेल आणि या प्रकरणाचा योग्य पाठपुरावा सुरूच राहील, असे फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.