
सध्याच्या घडीला राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत यांनी पवारांवर टीका केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या वतीने स्पष्टीकरण दिलं. शिंदे यांनी किती मिरच्या आणि जाळ लागला असं म्हटलं आणि परत त्यावर चर्चा सुरु झाल्या.
शरद पवार हे बेळगाव प्रश्नी बैठकीला आले होते. त्यावेळी ते माझ्या केबिनमध्ये आले. हे मला वर असताना समजलं, त्यावेळी मी कॅबिनेटमध्ये आलो होतो. त्यानंतर ते आल्याचं मला समजलं, मी तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांना श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला. त्यानंतर देवेन्द्रजी आणि माझ्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
जो रामाचा झाला नाही तो कोणाचा होणार नाही. कर्माची शिक्षा आठवली म्हणून रामरक्षा म्हणायला लागले. काही लोकांनी नवीन शोध लावलाय कि हनुमान मशालीच्या लंका जाळली. आता त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असते तर त्यानं जाळलं असं म्हटलं असत. उद्धवजी दादांना भेटून आले होते पण त्याचा आम्ही चुकीचा अर्थ काढला नाही असं शिंदे यांनी म्हटलं आहे.