‘चला हवा येऊ द्या’चे कलाकार किती मानधन घेत होते? जाणून घ्या किती कमावायचे महाराष्ट्राला हसवणारे हे कलाकार

Published : Jul 04, 2025, 07:07 PM ISTUpdated : Jul 04, 2025, 07:47 PM IST

मराठी -  ‘’चला हवा येऊ द्या'' नव्या स्वरुपात येणार आहे. पण या नवीन सादरीकरणात निलेश साबळे नसणार. अभिजित खांडकेकरला ही जबाबदारी देण्यात आली आहे. कलाकारही नवे असतील. या निमित्त जाणून घ्या ‘’चला हवा येऊ द्या''च्या जुन्या कलाकांचे मानधन होते तरी किती…

PREV
18
त्यांच्या अभिनयाने हा शो अधिक रंगतदार बनला होता

मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय आणि प्रेक्षकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. १८ ऑगस्ट २०१४ रोजी झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या या विनोदी कार्यक्रमाने अल्पावधीतच महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तत्कालिन घडामोडींवर आधारित डॉक्टर निलेश साबळे यांच्या हलक्याफुलक्या एकपात्री निवेदनाने कार्यक्रमाची सुरुवात होत होती, त्यानंतर मराठी चित्रपट आणि रंगभूमीतील मान्यवर कलाकारांची मुलाखत घेतली जात असे आणि मग सुरू होत होते भन्नाट विनोदी स्केचचा धमाल सत्र.

भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे, अंकुर वाढवे, योगेश शिरसाट, तुषार देओळे, उमेश जगताप आणि स्नेहल शिडम हे कार्यक्रमाचे मुख्य कलाकार होते. त्यांच्या अभिनयाने हा शो अधिक रंगतदार बनला होता.

28
‘चला हवा येऊ द्या’चा प्रवास

२०१४ मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळवलं होते. मात्र, ७ नोव्हेंबर २०१७ रोजी नवीन पर्वाच्या शूटिंगसाठी या शोने काही काळ विश्रांती घेतली होती. नंतर ८ जानेवारी २०१८ रोजी ‘विनोदचा जागतिक दौरा’ अशा विस्तारित शीर्षकासह शोने पुनरागमन केले. याला ‘वीणा वर्ल्ड टुर्स’कडून प्रायोजकत्व मिळाले होते.

तथापि, शोचे तिसरे आणि आठवे पर्व प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. विनोदाचा दर्जा खालावल्यामुळे या पर्वांवर टीका झाली. मार्च २४, २०२० रोजी कोविड-१९ महामारीमुळे दुसऱ्यांदा शोला थांबवावे लागले, पण १३ जुलै २०२० रोजी तो पुन्हा सुरू झाला. मात्र, ‘लेडीज जिंदाबाद’ नावाने आलेले आठवे पर्व प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादामुळे एप्रिल २०२१ मध्ये कोणत्याही अंतिम भागाशिवाय अचानक बंद करण्यात आले.

38
महाराष्ट्राला हसवणाऱ्या कलाकारांचं मानधन किती?

या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या बहारदार अभिनय, उत्कृष्ट टाइमिंग आणि सामाजिक घडामोडींवर आधारित सडेतोड विनोदांमुळे लोकप्रिय आहेत. पण हे सर्व कलाकार त्यांच्या अभिनयासाठी किती मानधन घेत होते, याबाबत अनेकांना उत्सुकता असते. चला, आता पाहूया त्यांच्या मानधनाची आकडेवारी:

48
भारत गणेशपुरे – ७५,००० रुपये प्रती भाग

‘पोलीस’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे भारत गणेशपुरे हे देखील या टीममधील महत्त्वाचे कलाकार. त्यांनी आपल्या अचूक संवादफेकीने आणि चेहऱ्यावरील भावनांनी विनोदाला एक वेगळी उंची दिली. एका भागासाठी त्यांना ७५,००० रुपये मानधन दिलं जात होतं, असं सांगितलं जातं.

58
कुशल बद्रिके – ७०,००० ते ८०,००० रुपये प्रती भाग

टायमिंगचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा कुशल बद्रिकेही शोचा एक महत्त्वाचा भाग होता. त्याचे विनोद आणि अभिनय यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक एपिसोडची उत्सुकता लागून राहत होती. एका भागासाठी तो ७०,००० ते ८०,००० रुपये इतकं मानधन घेत होते असं अहवालात म्हटलं आहे.

68
सागर कारंडे – ७०,००० रुपये प्रती भाग

अत्यंत जबरदस्त विनोदबुद्धी असलेला सागर कारंडे प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांना खळखळून हसवत होता. त्याच्या अचूक अभिनयासाठी त्याला ७०,००० रुपये प्रती भाग मानधन दिलं जात होतं, असं वृत्त माध्यमांतून सांगण्यात आलं आहे.

78
श्रेया बुगडे – ८०,००० रुपये प्रती भाग

‘चला हवा येऊ द्या’च्या टीममधील पहिली महिला विनोदी कलाकार म्हणून श्रेया बुगडे ओळखली जात होती. तिच्या अष्टपैलू अभिनयामुळे ती लवकरच प्रेक्षकांची लाडकी झाली होती. मीडिया अहवालानुसार, श्रेया बुगडे एका भागासाठी सुमारे ८०,००० रुपये मानधन घेत होती.

88
विनोद मागील मेहनत आणि गुणवत्ता

ही सगळी रक्कम जरी मोठी वाटत असली, तरी यामागे असलेली मेहनत, सातत्य, लेखन, स्क्रिप्ट वाचन, रिहर्सल्स आणि तासन् तास चालणाऱ्या शूटिंगचे श्रम लक्षात घेतल्यास हे मानधन योग्यच वाटते. एकापेक्षा एक व्यक्तिरेखा, नव्या कल्पना, सामाजिक विषयांवर आधारित स्केट्स, हे सर्व साकारताना या कलाकारांची सर्जनशीलता वाखाणण्याजोगी असते.

शोची लोकप्रियता आणि कलाकारांचं योगदान

‘चला हवा येऊ द्या’ हा केवळ एक मनोरंजन शो नाही, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता. मराठी कलाकार, दिग्दर्शक, चित्रपट, नाटके यांना एक हक्काचं व्यासपीठ देणाऱ्या या शोमुळे अनेक कलाकारांची कारकीर्द बहरली आहे.

या कार्यक्रमाचे यश मुख्यत्वे त्यातील कलाकारांच्या नैसर्गिक विनोदशैलीमुळे होतं. त्यांच्या मेहनतीमुळे प्रेक्षकांना आठवड्यातून दोन वेळा टेन्शन फ्री, हसतमुख वातावरण अनुभवायला मिळत होतं.

Read more Photos on

Recommended Stories