तांदूळ पाण्यात भिजवल्याने त्यातील फायटिक ॲसिडची पातळी कमी होते. हे फायटिक ॲसिड शरीराला आवश्यक असलेले लोह, कॅल्शियम आणि झिंक यांसारखी खनिजे शोषून घेण्यास अडथळा आणते. भिजवल्यामुळे हा अडथळा कमी होतो. त्यामुळे शरीर आवश्यक खनिजे सहजपणे शोषून घेऊ शकते. विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्धांसाठी हे खूप फायदेशीर आहे. यामुळे हाडे मजबूत होतात आणि ॲनिमियासारख्या समस्या कमी होतात. इतकेच नाही, तर भिजवलेले तांदूळ पचायलाही सोपे जातात. पोटदुखी, गॅस, अपचन यांसारख्या समस्या असलेल्यांना यामुळे आराम मिळतो, असे तज्ज्ञ सांगतात.