Vastu Tips: मुख्य दरवाजातून करकर आवाज येतोय? हे आहे मोठ्या संकटाचं लक्षण!

Published : May 23, 2026, 09:21 PM IST

Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येण्याचा मार्ग आहे. जर तुमच्या मुख्य दरवाजातून करकर आवाज येत असेल, तर ही फक्त एक तांत्रिक अडचण नाही, तर तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारा गंभीर वास्तुदोष आहे.

PREV
19
राहू दोष
मुख्य दरवाजातून येणारा करकर आवाज पत्रिकेतील राहू आणि केतूचे अशुभ परिणाम वाढवतो. यामुळे घरात अचानक अपघात किंवा कायदेशीर खर्चात वाढ होण्याची शक्यता असते.
29
मालमत्तेचे नुकसान
मुख्य दरवाजातून आवाज येत असेल तर घरात पैशांची आवक कमी होते. कोणतंही काम यशस्वी होत नाही आणि घरातली समृद्धी थांबते. हा दोष हळूहळू घरात गरिबी आणू शकतो.
39
मानसिक समस्या
रोज सकाळी आणि संध्याकाळी दरवाजाचा हा आवाज थेट मनावर परिणाम करतो. यामुळे मानसिक समस्या निर्माण होतात, कुटुंबातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढते आणि घरात विनाकारण भांडणं होतात.
49
घराचा दरवाजा अशाप्रकारे दुरुस्त करा
घराच्या मुख्य दरवाजातून आवाज येत असेल तर तो लगेच दुरुस्त करा. वास्तुदोषामुळे होणारं नुकसान टाळा. दरवाजाच्या बिजागरींना तेल लावा, जेणेकरून आवाज येणं बंद होईल.
59
वास्तु उपाय
दरवाजाचा आवाज बंद झाल्यावर वास्तुशास्त्रानुसार दरवाजा शुद्ध करा. दरवाजाची चौकट स्वच्छ पाण्याने पुसा. गंगेच्या पाण्यात किंवा शुद्ध पाण्यात थोडी हळद मिसळून चौकटीवर शिंपडा. हळद हे विष्णू आणि समृद्धीचं प्रतीक आहे. मुख्य दरवाजावर कुंकू किंवा हळदीने स्वस्तिक काढा. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही.
69
चौमुखी दिवा लावा
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. चौमुखी दिवा लावल्यास उत्तम, कारण तो खूप शुभ मानला जातो.
79
योग्य नावाची पाटी निवडा
घरासाठी योग्य नावाची पाटी निवडणं महत्त्वाचं आहे. दरवाजावर स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहिलेली पाटी लावा. लाकडी किंवा तांब्याची पाटी सर्वात शुभ मानली जाते.
89
तोरण लावा
मुख्य दरवाजाला ताज्या आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावा. हे खूप शुभ मानलं जातं. यामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही, असं मानलं जातं.
99
हे टाळा
मुख्य दरवाजासमोर चपला-बुटांचा ढीग ठेवू नका. दरवाजाच्या पुढे किंवा मागे चपला, बूट किंवा इतर तुटक्या-फुटक्या वस्तू ठेवल्यास घरात लक्ष्मीचा प्रवेश थांबतो. यामुळे राहू आणि केतूचा नकारात्मक प्रभाव वाढतो.
Read more Photos on

Recommended Stories