केंद्र सरकारने या गोंधळावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन पडताळणी यंत्रणा तयार केली आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकांतील माहिती आणि PM Kisan डेटाबेस यांची तुलना केली जात आहे.
शिधापत्रिकांमधील पती-पत्नीची एकत्र नोंद पाहून, दुहेरी लाभ घेणाऱ्यांची ओळख पटविणे सुलभ झाले आहे.
या प्रक्रियेनंतर अशा कुटुंबांमधील एका सदस्याचा हप्ता कायमचा थांबविण्याचा प्रस्ताव तयार होत आहे. तसेच, त्या व्यक्तीला ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’मधूनही वगळले जाईल.