LPG Cylinder New Rules: केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरच्या नियमांत ५ मोठे बदल केलेत, ज्यात दरात ७% वाढ, बुकिंगच्या नियमांत बदल, पीएनजी ग्राहकांसाठी कठोर नियम यांचा समावेश आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र ३०० अनुदान कायम ठेवण्यात आले आहे.
मुंबई: जागतिक घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता तुमच्या घराच्या बजेटवर होणार आहे. इराण-इस्रायल तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून केंद्र सरकारने एलपीजी (LPG) सिलेंडरच्या संदर्भात ५ अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सामान्य गृहिणींपासून ते उज्ज्वला लाभार्थ्यांपर्यंत, प्रत्येकासाठी हे बदल जाणून घेणे आवश्यक आहे.
27
१. खिशाला झळ: सिलेंडरच्या दरात ७% वाढ
७ मार्चपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोचा सिलेंडर आता ९६५ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. तब्बल एका वर्षानंतर झालेली ही दरवाढ मध्यमवर्गीयांचे मासिक गणित बिघडवणारी ठरली आहे.
37
२. दोन सिलेंडरमधील 'गॅप' वाढला (बुकिंगचा नवा नियम)
गॅसचा गैरवापर टाळण्यासाठी बुकिंगच्या नियमात मोठा फेरबदल करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात: आता एकदा सिलेंडर घेतल्यावर पुढील ४५ दिवसांनंतरच दुसरे बुकिंग करता येईल.
शहरी भागात: ही मर्यादा २५ दिवसांची ठेवण्यात आली आहे.
मर्यादा: एका कुटुंबाला वर्षाला जास्तीत जास्त १५ सिलेंडर मिळतील, त्यापैकी १२ सिलेंडरवर सबसिडी (अनुदान) लागू असेल.
वाढत्या महागाईत उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना केंद्राने मोठा आधार दिला आहे. या लाभार्थ्यांना ३०० रुपयांचे अनुदान कायम मिळणार असून, त्यांना सिलेंडर साधारण ५५० रुपयांत पडणार आहे. यात SC/ST, अंत्योदय आणि अति मागासवर्गीय कुटुंबांचा समावेश आहे.
57
४. PNG असेल तर LPG ला 'नो एन्ट्री'
ज्यांच्या घरात पाईपलाईन गॅस (PNG) आहे, त्यांच्यासाठी नियम कडक झाले आहेत. अशा ग्राहकांना आता नवीन सिलेंडर घेता येणार नाही किंवा जुना रिफिल करता येणार नाही. गॅस कंपन्यांनी पीएनजी ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन स्वेच्छेने सरेंडर करण्याचे आवाहन केले आहे.
67
५. आयातीचे संकट आणि नवीन पर्याय
भारताला ९०% गॅस आयात करावा लागतो. सध्या 'स्ट्रोट ऑफ हॉर्मुज'मधील तणावामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यावर उपाय म्हणून भारताने रशिया, अमेरिका, नॉर्वे आणि कॅनडाकडून गॅस घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच देशांतर्गत उत्पादन २८ टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे.
77
'गॅस जपून वापरणे' हाच सर्वसामान्यांसाठी उत्तम मार्ग
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता 'गॅस जपून वापरणे' हाच सर्वसामान्यांसाठी उत्तम मार्ग आहे.