काही सरकारी बँकांनी ग्राहकांच्या फायद्यासाठी किमान शिल्लक ठेवण्याची अट रद्द केली आहे. यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि इंडियन बँक यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले, “किमान शिल्लक रकमेबाबत रिझर्व्ह बँकेकडून कोणताही बंधनकारक नियम नाही. काही बँका ₹10,000, काही ₹2,000 अशी मर्यादा ठेवतात; तर काही बँका ही अट पूर्णपणे काढून टाकतात.”