Kitchen Tips: आंब्याचा सिझन सुरू झालाय, पण बाजारात केमिकलने पिकवलेल्या आंब्यांची विक्रीही वाढली आहे. हे भेसळयुक्त आंबे कसे ओळखायचे? आणि ते खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो? चला जाणून घेऊया.
उन्हाळा सुरू होताच आंब्याचा सिझनही सुरू होतो. सध्या बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. पण आंबे लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड आणि इथिलीन ऑक्साईडसारख्या रसायनांचा वापर केला जातो. हे आंबे खाल्ल्याने फूड पॉयझनिंग, पोटदुखी आणि अगदी कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे ते या गॅलरीमध्ये पाहूया.
27
1. बाजारातून आंबे आणल्यावर पाण्यात बुडवून ठेवा
बाजारातून आंबे आणल्यावर ते लगेच खाऊ नका. आधी एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात आंबे टाका. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा जड असल्यामुळे तो पाण्यात बुडतो. याउलट, केमिकलने पिकवलेला आंबा हलका असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. ही सर्वात सोपी आणि विश्वासार्ह पद्धत आहे.
37
2. आंब्यांच्या रंगाकडे नीट लक्ष द्या
आंब्यांच्या रंगाकडे नीट लक्ष द्या. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग सगळीकडे एकसारखा पिवळा नसतो. त्यावर हिरवे-पिवळे डाग दिसतात. पण केमिकलने पिकवलेला आंबा मात्र चमकदार पिवळा दिसतो. कधीकधी आंब्याचा देठाकडचा भाग हिरवागार असतो आणि बाकीचा आंबा पिवळाधम्मक असतो. असा चकचकीत आंबा दिसल्यास तो खरेदी करणे टाळा.
नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याची साल थोडी सुरकुतलेली आणि मऊ असते. दाबून पाहिल्यास तो सगळीकडून एकसारखा दाबला जातो. याउलट, केमिकलने पिकवलेला आंबा दिसायला खूप आकर्षक आणि गुळगुळीत असतो. पण त्याला स्पर्श केल्यास काही ठिकाणी तो दगडासारखा कडक तर काही ठिकाणी खूपच मऊ लागतो.
57
4. वास
नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा एक प्रकारचा गोड सुगंध येतो. पण कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेल्या आंब्याला तसा सुगंध येत नाही. उलट, त्याला एक विचित्र किंवा औषधासारखा वास येऊ शकतो.
67
5. आतला गर
नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा कापल्यावर आतला गर गडद पिवळ्या किंवा केशरी रंगाचा असतो. पण केमिकल वापरलेला आंबा बाहेरून पिवळा दिसत असला तरी, कापल्यावर आतला गर फिकट पिवळ्या रंगाचा (कच्चट) दिसतो.
77
आंबा खाण्यापूर्वी किमान 15-20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा.
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आणलेला आंबा केमिकलने पिकवलेला आहे, तर तो खाण्यापूर्वी किमान 15-20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर तो स्वच्छ धुवून आणि साल काढून मगच खा. यामुळे आंब्याच्या सालीवर असलेल्या रसायनांचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल.