महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त पगार देण्यासंबंधी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे, जो महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी दिला जातो.
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली चांगली बातमी, आता बँक खात्यात किती पगार येणार?
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पगार देण्यात येणार आहे. याबाबत सरकारने एक पत्रक जारी केलं असून त्यामध्ये याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
25
सरकारच्या पत्रकात काय म्हटलं?
महागाई भात्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या पत्रकात सरकारने म्हटले की, भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक 1/1(i)/2026-E.I (B), दि. 22/04/2026 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.
35
महागाई भत्ता म्हणजे काय?
महागाई भत्ता म्हणजे महागाईचा प्रभाव कमी कारण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रक्कम दिली जाते. 60 टक्के महागाई भत्ता म्हणजे मूळ वेतनाच्या तुलनेत 60 टक्के अतिरिक्त रक्कम जी नोकरदारांना दिली जाते.
महागाई वाढली की दररोजचा खर्चही वाढतो. अशा परिस्थितीत सरकार डीए वाढवून कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती संतुलित करण्याचा प्रयत्न करत आहे.
55
गेल्या वर्षी किती भत्ता मिळतो?
2021 पासून, त्यात 10 पट वाढ झाली आहे. अहवालानुसार, जुलै 2021 मध्ये सर्वात मोठी वाढ 11 टक्क्यांनी दिसून आली होती. तर जानेवारी 2025 आणि जुलै 2025 मध्ये अनुक्रमे 2 टक्के आणि 3 टक्के वाढ झाली आहे.