गणेश चतुर्थी हा भक्ती, आनंद आणि श्री गणेशाला शुद्ध नैवेद्य अर्पणाचा करण्याचा काळ आहे. तथापि, काही वस्तू अशुभ मानल्या जातात आणि विधी आध्यात्मिकदृष्ट्या सुसंगत आणि शुभ राहण्यासाठी त्या टाळल्या पाहिजेत. हे पदार्थ कोणते ते जाणून घ्या.
गणेश चतुर्थी हा गणपती बाप्पाचा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. बाप्पाला अडथळे दूर करणारा, बुद्धी, समृद्धी आणि यश देणारा देव मानले जाते. या सणात भक्त बाप्पाला प्रार्थना, गोड पदार्थ आणि नैवेद्य अर्पण करतात. मोदक, लाडू आणि फळे शुभ मानली जातात, पण काही वस्तू अशा आहेत ज्या गणेश पूजेत कधीही अर्पण करू नयेत. त्या टाळल्याने पूजा शुद्ध राहते आणि आध्यात्मिकदृष्ट्या योग्य मानली जाते.
211
टाळायच्या वस्तू : तुळशीची पाने
हिंदू धर्मात तुळस पवित्र आहे, पण गणेश पूजेत ती अर्पण करणे निषिद्ध आहे. आख्यायिकेनुसार तुळशीने गणेशाला शाप दिला असल्यामुळे तुळशीची पाने अशुभ मानली जातात.
311
मांसाहार –
मांस, मासे, अंडी यांसारखे पदार्थ पूर्णपणे बंद आहेत. गणेश हे शुद्धतेचे प्रतीक आहेत, त्यामुळे असे अन्न अर्पण करता येत नाही.
हे तामसिक (अशुद्ध) मानले जातात. त्यामुळे गणेश चतुर्थीसारख्या महत्त्वाच्या पूजेत हे वापरले जात नाहीत.
511
कारले –
कारल्याची चव कडू असल्यामुळे ते नैवेद्यात देणे टाळले जाते. नैवेद्य नेहमी गोड आणि आनंददायक असावा, असे मानले जाते.
611
दारू, तंबाखू व मादक पदार्थ –
हे सर्व पूजा अपवित्र करतात. त्यामुळे गणेश पूजेत त्यांना स्थान नाही. शिवाय या दिवसांमध्ये हा आहारही वर्ज करावा.
711
शीळे अन्न –
बाप्पाला नेहमी ताजे अन्न व प्रसाद अर्पण केला जातो. मागील दिवसाचे उरलेले पदार्थ अर्पण करणे चुकीचे मानले जाते.
811
किडे असलेले, तुटलेले तांदूळ –
पूजेत फक्त संपूर्ण तांदळाचे दाणे (अक्षता) वापरले जातात. तुटलेले तांदूळ अर्पण केल्याने समृद्धीला अडथळा येतो, असे मानले जाते. तसेच कीड लागलेले तांदूळ नको.
911
तीळ –
काही ठिकाणी शुभ मानले जात असले तरी गणेश चतुर्थीच्या नैवेद्यात ते टाळले जातात. कारण तीळ प्रामुख्याने पितृ पक्षाशी जोडलेले मानले जातात.
1011
सीताफळ आणि जांभूळ –
या फळांना पूजेत अपवित्र मानले जाते. त्याऐवजी केळी, नारळ, पेरू यांसारखी फळे अर्पण करावीत.
1111
लाल मिरच्या व मसाले –
बाप्पाला सौम्य, सात्विक पदार्थ अर्पण केले जातात. तिखट व मसालेदार पदार्थ नैवेद्यासाठी योग्य नाहीत.