गाड्या बदलण्याच्या या प्रक्रियेमुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो, वेळापत्रक बिघडते आणि खर्चातही वाढ होते. मात्र, जर भुसावळहून निघणारी मेमू रेल्वे थेट कसारापर्यंत धावली, तर भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.