
दुबई: महिला आशिया कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा टीम मेंटॉर वहाब रियाझवर एका चाहत्याने आपला राग व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात हा चाहता टीमसाठी ट्रॉफीपेक्षा भारताला हरवणं जास्त महत्त्वाचं असल्याचं उघडपणे बोलत आहे.
एका लाईव्ह कार्यक्रमात या चाहत्याने वहाब रियाझला सांगितलं, "आम्हाला ट्रॉफी नको, फक्त भारताला हरवून दाखवा." आशिया कपच्या ग्रुप स्टेज मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. या मॅचमध्ये पाकिस्तानचा महिला संघ टी-२० क्रिकेटमधील आपल्या सर्वात कमी धावसंख्येवर, म्हणजे फक्त ५५ रन्सवर ऑलआऊट झाला होता. त्यानंतर भारताने फक्त ८.४ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स गमावून सहज विजय मिळवला.
Fans to Wahab Riaz: "We don’t need the trophy" we just want to beat India", This is the Pakistani mindset, and This is the reason their cricket has been on a downward spiral pic.twitter.com/5JNO4CDzBp
— Space Recorder (@1spacerecorder) September 8, 2026
या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा संताप वाढला आहे. ग्रुप 'ए' मधून भारत पहिल्या स्थानावर राहून सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. तर, भारताकडून मोठा पराभव होऊनही, पाकिस्तानने हाँगकाँगवर मोठा विजय मिळवून सेमीफायनल गाठली आहे. आता सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा सामना सध्याची चॅम्पियन श्रीलंकेशी होणार आहे. जर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ आपापल्या सेमीफायनल मॅच जिंकले, तर १३ सप्टेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने येतील.