Ganesh Chaturthi 2025 : गणपती प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कधी? ऐतिहासिक महत्त्व काय? जन्म कसा झाला?

Published : Aug 27, 2025, 12:30 AM IST

पुणे : घराघरात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा हा मंगल दिवस बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. भाविकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असून बाप्पाच्या स्वागताची लगबग महाराष्ट्रभर सुरू झाली आहे.

PREV
15
अडीच तासांचा सुवर्णयोग

असं म्हटलं जातं “जिथे गणपतीचा वास, तिथे सर्व प्रकारचं मंगल घडतं.” यावर्षी बाप्पाचं आगमन अत्यंत शुभ मुहूर्तावर होत असल्याने श्रद्धाळूंचा आनंद अधिकच द्विगुणित झाला आहे.

शुभ मुहूर्त आणि पूजेचा कालावधी

पंचांगानुसार, चतुर्थी तिथी २६ ऑगस्ट रोजी दुपारी १:५४ वाजता सुरू होऊन २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३:४४ वाजता समाप्त होईल. ज्योतिषशास्त्र सांगते की श्रीगणेश पूजेचा सर्वोत्तम काळ २७ ऑगस्ट, सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० असा असेल. म्हणजेच भाविकांना अडीच तासांचा सुवर्णयोग लाभणार आहे. याच काळात बाप्पाची स्थापना केली तर घरामध्ये सुख, शांती आणि संपन्नता नांदते, असा विश्वास आहे.

25
गणेश विसर्जन

गणेशोत्सवाचा शेवट जरी विसर्जनाने होत असला तरी, तो दिवस भक्तांसाठी निरोपाचा आणि पुढील वर्षीच्या पुनर्भेटीच्या आशेचा असतो. यंदा ६ सप्टेंबर २०२५, शनिवार या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाईल.  काही जण दिड दिवसांचा गणपती बसवतात. त्याचे विसर्जन दुसऱ्या दिवशीच केले जाते तर काही जण आठव्या आणि नवव्या दिवशीही विसर्जन करतात. तर काही गणपती दहा दिवस झाले तरी विसर्जित केले जात नाहीत.

35
गणेशोत्सवाचं ऐतिहासिक महत्त्व

गणेश चतुर्थी हा फक्त धार्मिक नाही तर सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही फार महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रभावना वृद्धिंगत करण्यासाठी या उत्सवाला प्रारंभ केला. पुढे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटीत लोकांना एकत्र आणण्यासाठी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. परिणामी गणेशोत्सव हा फक्त पूजा नसून एकतेचं प्रतीक ठरला.

आजही समाजाच्या विविध स्तरांतील लोक एकत्र येऊन बाप्पाची स्थापना करतात, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात आणि भक्तिरसात न्हाऊन निघतात. गणेशोत्सव म्हणजे समाजजीवनात ऊर्जा, उत्साह आणि ऐक्य निर्माण करणारा पर्व.

45
भगवान गणेशाचा पुराणप्रसिद्ध जन्म

गणेशाची कथा प्रत्येक घराघरात सांगितली जाते. पार्वतीने आपल्या अंगावरील उटण्याच्या मातीपासून गणेशाची निर्मिती केली. स्नान करताना घराच्या दाराशी त्याला रक्षक म्हणून उभं केलं. भगवान शिव घरी परतले, तेव्हा अनोळखी मुलाने त्यांना अडवलं. रागाच्या भरात शिवांनी गणेशाचं मस्तक छाटलं. पार्वतीच्या दुःखाने व्याकुळ होऊन शिवांनी त्याचं डोकं हत्तीच्या शिराने जोडून त्याला पुनर्जीवित केलं. तेव्हापासून गणेश हे "गजानन" म्हणून पूजले जातात.

55
भाविकांसाठी संदेश

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधी नाही, तर आत्मिक शांती, सामाजिक एकता आणि सांस्कृतिक समृद्धीचा संदेश देणारा पर्व आहे. यावर्षीचा शुभ मुहूर्त भक्तांना आनंद, सुख, आरोग्य आणि समृद्धी देईल, असा विश्वास आहे.

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात प्रत्येक मराठी मने भारावून जातील. पुणे, मुंबई, कोल्हापूर ते विदर्भापर्यंत – महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाप्पाचं स्वागत भक्तिभावाने होईल.

Read more Photos on

Recommended Stories