
Mumbai Local Update : मुंबईत कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आजही पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे हार्बर मार्गावर नेरुळ ते जुईनगर दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. अशातच पनवेलवरुन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
मुंबईतील पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मालाड ते बोरिवलीदरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याची स्थिती आहे. याशिवा. वांद्रे, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरील जोरदार पाऊस सुरू आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, उद्या मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा IMD ने दिला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.