Mumbai Water Cut Alert: मुंबईत २२ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका बसणार? पाहा सविस्तर माहिती

Published : Nov 12, 2025, 04:56 PM IST
Mumbai Water Cut Alert

सार

Mumbai Water Cut Alert: मुंबई महानगरपालिकेतर्फे १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी २२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तानसा आणि विहार जलवाहिन्यांच्या दुरुस्ती कामामुळे एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागातील अनेक भागांमध्ये पाणी येणार नाही. 

मुंबई: मुंबईकरांनी लक्ष द्या! महानगरपालिकेने जाहीर केले आहे की १४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान शहरातील अनेक भागांत २२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद का राहणार?

तानसा आणि विहार जलवाहिन्यांवरील दुरुस्ती व पाइपलाइन बदलण्याचे महत्त्वाचे काम महापालिकेकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या काळात जलवाहिनीवरील झडपांची दुरुस्ती, बदल आणि जलवाहिन्या जोडण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

या भागांमध्ये २२ तास पाणीपुरवठा बंद राहणार

एन विभाग

राजावाडी पूर्व, चित्तरंजन नगर, विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओ.एन.जी.सी. वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर.एन. गांधी मार्ग –

१५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.४५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत

एल विभाग

न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस.जी. बर्वे मार्ग (कुर्ला पूर्व), नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलिस वसाहत, कसाईवाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवरार्ड नगर, तक्षशिला नगर, व्ही.एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, चुनाभट्टी फाटक, हिल रोड, ताडवाडी, समर्थ नगर –

१४ नोव्हेंबर सकाळी १० वाजल्यापासून १५ नोव्हेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत

एम पश्चिम विभाग

टिळक नगर, ठक्कर बाप्पा वसाहत, शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, गोदरेज वसाहत, भक्ती पार्क, अजमेरा वसाहत आणि इतर परिसर.

एफ उत्तर विभाग

शीव पश्चिम आणि पूर्व, दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा आणि चुनाभट्टीचे काही भाग.

महापालिकेचे आवाहन

महापालिकेने नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत.

पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीत पाणी साठवून ठेवा.

पाण्याचा वापर संयमाने आणि काळजीपूर्वक करा.

या दुरुस्ती कामामुळे होणाऱ्या असुविधेबद्दल महापालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

महापालिकेने सांगितले की, या कामामुळे भविष्यात पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम आणि सुरळीत होईल. त्यामुळे नागरिकांनी थोडी गैरसोय सहन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील या २२ तासांच्या वॉटर कटमुळे अनेक भागांतील नागरिकांना त्रास होणार असला तरी, हे काम शहराच्या दीर्घकालीन सोयीसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पाणी आधीच साठवा आणि जबाबदारीने वापरा! 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!