या विस्तारामुळे ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख शहरे मेट्रोच्या नकाशावर येणार आहेत.
मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण): या मार्गिकेचा विस्तार आता दुर्गाडी नाका ते थेट टिटवाळा (५ क) आणि कल्याण-उल्हासनगरमार्गे चिखलोली (५ अ) पर्यंत केला जाईल. चिखलोलीतून ही मेट्रो पुढे थेट बदलापूरपर्यंत (५ ब) नेण्याचे नियोजन आहे.
मेट्रो १२ (कल्याण-तळोजा): ही मार्गिका आता कळवा आणि मुंब्रा परिसराला जोडली जाणार आहे, ज्यामुळे नवी मुंबईचा प्रवास अधिक सुकर होईल.
मेट्रो १४ (कांजूरमार्ग-बदलापूर): या मार्गिकेमुळे बदलापूरकरांना थेट मुंबई गाठणे सोपे होणार आहे.