भारतीय हवामान खात्याने मुंबई शहर व उपनगरांसाठी रेड अलर्ट जाहीर केला होता. रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस सकाळी अधिक तीव्र झाला. सायन, कुर्ला, चेंबूर, वडाळा, भांडुप, मुलुंड, ठाणे या ठिकाणी रेल्वे रुळांवर गुडघाभर पाणी साचले. यामुळे मध्य व हार्बर मार्गावरील सर्व गाड्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. परंतु, ८ तासांनीही सेवा सुरु झालेली नाही.