Mumbai : दादरमधील कबुतरखाना आंदोलन प्रकरणात 150 जणांविरोधात गुन्हा दाखल,नेमक काय घडलं होत? वाचा सविस्तर

Published : Aug 20, 2025, 08:46 AM IST
Kabutar Khana

सार

दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरुन काही दिवसांपूर्वी जैन समाजाने मोठे आंदोलन केले होते. यावेळी कबुतराखान्यावर घालण्यात आलेली ताडपत्री आणि बांबू देखील काढले होते. अशातच 150 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई : दादरमधील कबुतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ ऑगस्ट रोजी जैन समाजाने मोठ्या संख्येने जमाव जमवून आंदोलन केले होते. ताडपत्री फाडून बांबू उखडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत १५० जणांविरोधात गुन्हा नोंदवला असल्याची माहिती समोर आली.

न्यायालयाचे आदेश आणि महापालिकेची कारवाई

मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. कबुतरांच्या विष्ठेमुळे आजारांचा प्रसार वाढत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे महापालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री टाकली आणि सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी आणली. कबुतरांना खायला घातल्यास दंडही आकारण्यात येऊ लागला.

जैन समाजाचा तीव्र विरोध

या कारवाईला जैन समाजाने मोठा विरोध दर्शवला. त्यांना हा धार्मिक प्रश्न असल्याचे वाटते. दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री लावल्याने जैन समाजातील महिलांनी ती स्वतः काढली. त्यांनी बांधलेले बांबू देखील हटवले. आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, ६ ऑगस्ट रोजी सकाळी कबुतरखान्यात जैन समाजाने प्रार्थना सभा आयोजित केली होती. सुरुवातीला काहींनी आदेश पाळण्याची तयारी दाखवली. परंतु अचानक काहींनी ताडपत्री फाडून हटवण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि अखेर पोलिसांना कारवाई करावी लागली.

आरोग्य आणि सार्वजनिक हिताचा मुद्दा

कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार, त्वचाविकार आणि झुनोटिक आजार पसरतात. क्रिप्टोकोकोसिस, साल्मोनेलोसिस, पोपट ताप यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. यामुळे सर्व वयोगटातील लोकांना धोका असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच कबुतरखाना परिसरात वाहतुकीला अडथळाही निर्माण होत असल्याची तक्रार आहे.

धार्मिक भावना विरुद्ध सार्वजनिक आरोग्य

महापालिकेच्या कारवाईमुळे धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न उभा राहिला आहे. जैन समाजाने हा धार्मिक मुद्दा मानत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे, प्रशासन सार्वजनिक आरोग्यासाठी कठोर पावलं उचलण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि सार्वजनिक आरोग्य या दोन मुद्द्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!