बदलापूर–कर्जत या विभागासाठी ३२ किमी लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या विस्तारित मार्गामुळे
रेल्वे वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल
गाड्यांचा वेग आणि वारंवारता सुधारेल
कोंडी व विलंब कमी होतील
प्रवासाचा वेळ लक्षणीय घटेल
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दृष्टीने हा कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा असून नव्या मार्गिकेमुळे भविष्यातील प्रवासी वाढ सहज पेलता येणार आहे. तसेच दक्षिण भारताशी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.