मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानच्या ३२.४६ किलोमीटर अंतराचे चौपदीकरण केले जाणार आहे.
अंमलबजावणी: मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) या प्रकल्पाचे काम करणार आहे.
नियोजित कालावधी: भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर पुढील ३ ते ४ वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
फायदा कोणाला?: बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत या स्थानकांवरील लाखो प्रवाशांना याचा थेट लाभ मिळेल.