Mumbai Airport Plane Accident : मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, अकासा एअरच्या विमानाला मालवाहू ट्रक घासला; उड्डाण रद्द!

Published : Jul 14, 2025, 07:21 PM ISTUpdated : Jul 14, 2025, 07:27 PM IST
Mumbai Airport Plane Accident

सार

Mumbai Airport Plane Accident : मुंबई विमानतळावर अकासा एअरलाइन्सच्या विमानाला मालवाहू ट्रक घासला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु विमान आणि ट्रकचे नुकसान झाले. प्रवाशांना पर्यायी विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले.

मुंबई : आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका मोठ्या अपघाताचा धोका टळला. पहाटेच्या सुमारास, टेकऑफपूर्वीच एका मालवाहू ट्रकने अकासा एअरलाइन्सच्या QP1410 या विमानाला घासला आहे. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले असून, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्थेतून त्यांना दिल्लीला पाठवण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु विमान आणि ट्रक दोघांचेही नुकसान झाले आहे.

नेमके काय घडले?

ही घटना पहाटे ४:५४ वाजता घडली. अकासा एअरलाइन्सचे हे विमान बेंगळुरूवरून मुंबईला आले होते आणि ते बे A-7 वर पार्क केले होते. काही वेळानंतर हेच विमान दिल्लीकडे रवाना होणार होते. विमानातून माल उतरवण्याचे काम सुरू असताना, 'बर्ड वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस'चा एक मालवाहू ट्रक विमानावर आदळला. हा ट्रक विमानातील उजव्या पंखाला धडकला, ज्यामुळे विमान आणि ट्रक दोघांचेही मोठे नुकसान झाले.

तांत्रिक अडचण आणि पर्यायी व्यवस्था

धडकेनंतर विमानाची तात्काळ तपासणी करण्यात आली. यात हे विमान उड्डाणासाठी योग्य नसल्याचे आढळले आणि ते तांत्रिकदृष्ट्या एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड (AOG) घोषित करण्यात आले. त्यानंतर, अकासा एअरलाइन्सने तातडीने VT-VBB हे दुसरे विमान उपलब्ध करून दिले. या विमानातून सर्व प्रवाशांना दिल्लीला पाठवण्यात आले.

चौकशीचे आदेश, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर अकासा एअरलाइन्सने एक निवेदन जारी केले, ज्यात कोणालाही इजा झाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

अलीकडील विमान अपघात, एक चिंताजनक स्थिती

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्याच महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक विमान कोसळले होते, ज्यात २४१ विमान प्रवाशांसह २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानाच्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान कोसळल्याने संपूर्ण देश हळहळला होता. आजचा अपघात टळला असला तरी, विमान प्रवासाच्या सुरक्षेबद्दलची चिंता मात्र वाढली आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!