१०० टक्के शेतकऱ्यांना मोफत वीज देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

Published : Jul 01, 2026, 04:20 PM IST
devendra fadanvis

सार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. जलसंधारण, मागेल त्याला शेततळे, मोफत वीज आणि सौर कृषी पंप यांसारख्या योजनांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आनंदी झाला असून, त्यांचे जीवनमान सुधारत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्यांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जलसंधारणाची काम केल्याचा उल्लेख यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या गावांमध्ये आधी एक पीक घेतलं जात होत, तिथं दोन ते तीन पीक घेतली जात आहेत. आपण मागेल त्याला शेततळं दिल असून त्यामाध्यमातून महाराष्ट्रात शेततळी तयार झाली आहेत.

शेतकरी वाचायला हवा 

हवामानाच्या लहरीपणातही आमच्या शेतकऱ्याची शेती वाचायला हवी. आज मला सांगताना आनंद होतोय की, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला. आता आपण सौर कृषी पंप देणं सुरु केलं आहे. आज देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्यापैकी ६० टक्के पंप एकट्या महाराष्ट्रात देण्यात आल्या आहेत.

शेतकरी आज आनंदी झालेत 

आजचे शेतकरी आनंद झाले आहेत. ७५ टक्के शेतकऱ्यांपर्यंत आम्ही यशस्वीरीत्या पोहचले आहेत. १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा बारा तास तास वीज पहिल्या टप्यात १२ तास होऊ शकणार नाही. शेवटी १२ तास अशा पद्धतीने वीज आणि तीही मोफत वीज हि देण्याचं काम तीही मोफत वीज देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललय.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Sachin Ahir : उबाठामधून बाहेर पडताच सचिन अहिरांना मोठी जबाबदारी; उपसभापतीपदी बिनविरोध निवड
Chembur School Bus : चेंबूर दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही; मंत्री योगेश कदम यांचा इशारा