
सध्याच्या घडीला तुकाराम मुंढे हे वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आले आहेत. आता त्यांनी कॅन्सरबाबत एक विधान करून सर्वांना धक्का दिला आहे. मुंढे यांनी म्हटलं आहे की, अनेकदा एखादा व्यक्ती सिगारेट किंवा दारू घेत नाही. तरीही तो मला कॅन्सर कसा झाला हे विचारतो. अशावेळी त्याच्या राहणीमानात आणि खाण्यात हे कारण लपल्याच आपल्याला समजत.
मला या पदावर आल्यावर माहित झालं की आपण जे जेवतो त्या प्रत्येक पदार्थात भेसळ होत असते. आपण भेसळयुक्त पदार्थ झाल्यामुळं आपण आजारी पडत असतो. आपण शाळेमध्ये हे नियम कसे पाळण्यात येतील याबद्दल काळजी घेत आहोत. शाळेमध्ये होणारा बदल हा माझ्या एकट्याने होणार नाही. त्यासाठी आपल्याला सर्वाना मिळून निर्णय घ्यावा लागणार आहे.
आपली मुलं हि घरी असताना टीव्ही पाहत कोल्ड्रिंक पितात. त्यावेळी आपण त्यांना पिऊ नको असं म्हणू शकतो. पण त्याच पालन करायचं की नाही हा निर्णय त्याला घ्यायचा असतो. अशावेळी त्यानं आपल्या आयुष्यात या नियमांचे पालन करायला हवं. आपण सगळं हे आचरणात जोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत समाज हा पुढं जाऊ शकत नाही.