मुसळधार पावसाने मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली, 18 गावांचा संपर्क तुटला

Published : Jul 07, 2024, 05:56 PM IST
thane bridge under water

सार

ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्यामार्फत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

ठाणे : जिल्ह्यात पहाटेपासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकल वाहतूक सेवेवरही पावसाचा परिणाम झाला असून काही गाड्या उशिराने धावत आहेत. मुसळधार पावसामुळे मुरबाडहून वाशिंदकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिखले गावातील काळू नदीवरील पूल पुराच्या पाण्याखाली गेला आहे. या पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे शहापूर तालुका आणि मुरबाड तालुक्यातील सुमारे 18 गाव-पाड्यांचा संपर्क पहाटेपासून तुटला आहे. त्यामुळे गावाकडून शहरांकडे जाणाऱ्या चाकरमानीसह दूध, भाजीविक्रेत्यांसह किरकोळ व्यापारी व नागरिकांची तारांबळ उडाली असून पुलाच्या अलिकडे व पलिकडे नागरिक अडकून पडले आहेत.

ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्यामार्फत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या वाढत्या पातळीवर ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेऊन आहे. ज्या ठिकाणी पुराचा जास्त धोका आहे, त्या ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. काळू नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून डोंगर भागातील घाट माथ्यावर सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाकडून स्थानिक यंत्रणांना भुस्खलन होऊ शकणाऱ्या गावांची आणि क्षेत्रांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करुन तेथील स्थानिक जनतेला याबाबत माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

अनेक गावपाड्यांचा संर्पक तुटला

पुराच्या पाण्याखाली गेलेला पूल हा शिरगाव, चिखले, झापवाडी, मुरबाड तालुक्यातील गावांसाठी संपर्करस्ता आहे. याशिवाय शहापूर तालुक्यातील शेरा, अंबरचा मड, मासवणे, बावघर, भय या गावांचाही संपर्क तुटला आहे. या गावाच्या आसपास असलेल्या अनेक गावपाड्यांचा टिटवाळा, वाशिंद-मुरबाड, शहापूर शहरासोबतचा संपर्क तुटला आहे.

आणखी वाचा :

Ashadhi Wari 2024 : रविवारपासून विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू, दररोज 1 लाखाहून अधिक भाविकांचे होणार दर्शन

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!