
राज्यात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. आता उन्हाच्या झळा कमी झाल्या असून वारे वाहायला लागले आहेत. आज राज्यात पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र उरलेल्या राज्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पुणे, नाशिक, कोकण आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, नाशिक, मुंबई, रायगड, रत्नागिरी काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी उघडीप राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर धुळे, नंदुरबार,जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.