गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पुढाकार
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आणि एप्रिल 2025 मध्ये लेखी मागणी करत ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सरकारने अधिकृत घोषणा केली आहे.
"मेहनती आणि कर्तव्यनिष्ठ पोलिस अंमलदारांना अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी यासाठी विभागीय परीक्षा अत्यंत गरजेची होती. या निर्णयामुळे पोलिस दलात नवचैतन्य येईल."
– योगेश कदम, गृहराज्यमंत्री