पडताळणीचा फटका आणि तांत्रिक अडचणी
या योजनेतील पडताळणीमुळे अनेक महिलांना हप्त्यांपासून वंचित रहावे लागले आहे. काही महिलांचे अर्ज निकषांमध्ये न बसल्याने रद्द झाले, तर काहींना तांत्रिक अडचणींमुळे हप्ते मिळालेले नाहीत.
मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, “लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटी 63 लाखांपेक्षा अधिक नोंदणी झाली होती. मात्र, खात्रीशीर तपासणीनंतर हा आकडा 2 कोटी 48 लाखांवर आला. जर स्क्रूटिनी केली नसती, तर चुकीचे लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिकच राहिली असती.”