
पिंपरी चिंचवड: पावसामुळं सध्याच्या काळात दुर्घटना घडण्याचा प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. आता मृतांचा आकडा हा ९ पर्यंत जाऊन पोहचला आहे. कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळल्यामुळं हि दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या वतीने तातडीने बचाव मोहीम राबवण्यात आली. या दुर्घटनेत ९ जणांना वाचवण्यात पथकाला यश आलं.
हि दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य तातडीने राबवण्यात आलं. या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने हे बचाव कार्य राबवण्यात आलं होतं. या बचावकार्याच्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी ८३ तास शोधमोहीम राबवण्यात आली.
या सर्व ठिकाणांची तपासणी झाल्यानंतर शोधमोहीम पूर्णपणे थांबवण्यात आली. या भीषण दुर्घटनेमुळं संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपासाला वेग आला. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड येथे बैठक घेतली. आता लवकरच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.