गर्दीवर नियंत्रण: हे ॲप पोलिसांना आणि प्रशासनाला कोणत्या भागात किती गर्दी आहे, याची अचूक माहिती देईल. त्यामुळे चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळता येतील.
२० हून अधिक भाषांचा आधार: देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेऊन हे ॲप २० पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.
रिअल-टाइम माहिती: घाटांवरील गर्दी, उपलब्ध पार्किंग, पिण्याच्या पाण्याची सोय आणि आपत्कालीन सेवांची माहिती भाविकांना एका क्लिकवर मिळणार आहे.
आपत्कालीन समन्वय: कोणत्याही दुर्घटनेच्या वेळी प्रशासन आणि मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांमध्ये वेगवान समन्वय साधण्यासाठी हे ॲप 'डिजिटल कणा' म्हणून काम करेल.