सध्याच्या नियमांनुसार, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीन होती, त्यांनाच या योजनांचा लाभ मिळतो. मात्र, त्यानंतर ज्यांनी जमिनीची खरेदी केली, वाटणीपत्र झाले किंवा देणगीपत्राद्वारे जमीन नावावर झाली, त्यांना या लाभातून वगळण्यात आले आहे. यामुळे राज्यातील हजारो नवीन शेतकरी वर्षाकाठी मिळणाऱ्या १२ हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित आहेत.
"१ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन खरेदी करणारे शेतकरी पात्र ठरत नाहीत, हा निकष बदलण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे आग्रही आहोत," असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी आमदार समाधान अवताडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.