
राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अवघ्या चार दिवसांत 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्याचा आरोप होत असून, या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मागील वर्षी ऑगस्टपासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यावर स्थगिती होती. मात्र, अचानक मंत्रालयातून ही स्थगिती हटवून प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात झाल्याचे समोर आले आहे.
अनेक शाळांना शासकीय वेळ संपल्यानंतर सायंकाळी प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
75 पैकी 25 शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसमूहाच्या असल्याची माहिती आहे. तसेच St. Xavier's च्या 5 शाळांना आणि काही अन्य संस्थांनाही अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला आहे.
अल्पसंख्यांक दर्जामुळे शाळांना काही विशेष सवलती मिळतात:
युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी या प्रक्रियेमागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. शासकीय दुखवट्याच्या काळात घाईघाईने प्रमाणपत्रे देण्यात आल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर सीआयडीमार्फत चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्यातील साडेआठ हजारांहून अधिक अल्पसंख्यांक शाळांची चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.