पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
पंकजा मुंडे यांच्या कथित वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, "माझ्या कानावर त्यांचं वक्तव्य आलं नाही, पण त्या असं बोलल्या असतीलच तर मराठा समाजाने सतर्क राहणं गरजेचं आहे." ते पुढे म्हणाले, “ज्यांचं राजकारण मराठ्यांच्या मतांवर उभं राहिलं, तेच नेते जर गोरगरीब मराठा तरुणांच्या मुलावर घाव घालतात, तर ते निंदनीय आहे. मराठवाड्यातील आणि बीड जिल्ह्यातील मराठा नेत्यांनी जातीचा विचार न करता एकत्र येऊन समाजासाठी काम करावं.”