Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने नवरात्रीच्या सुरुवातीलाच राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला. राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.
29
नवरात्रीतील गरब्यावर पावसाचं सावट
नवरात्रीचा उत्सव जोरात सुरू होण्याआधीच पावसाचं सावट दिसत आहे. राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता 22 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
39
कोणकोणते जिल्हे अलर्टमध्ये?
कोकण व मुंबई परिसर
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
वादळी वारे + विजांचा कडकडाट + मध्यम ते मुसळधार पाऊस
शेतकरी बांधवांनी शेती व उघड्यावर ठेवलेला माल सुरक्षित ठिकाणी हलवावा.
99
राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार
राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, गरब्याचे आयोजन खुले मैदानात करताना हवामानाचा अंदाज पाहून निर्णय घ्यावा. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.