निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांच्या मते, १२ सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढेल. त्यावेळी विदर्भ, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, मुंबईसह कोकण व मराठवाड्यात केवळ तुरळक ठिकाणीच मध्यम सरी पडतील.