
Maharashtra : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान या ‘मिनी विधानसभा’ निवडणुका होण्याची चिन्हं आहेत. सत्ताधारी महायुतीने (शिंदे, फडणवीस आणि अजित पवार) आधीच रणनिती आखायला सुरुवात केली असून, स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मोठा इलेक्शन प्लॅन तयार केला आहे. दुसरीकडे, ठाकरे गट आणि मविआ या रणनीतीला कसे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीने जिल्हा पातळीवरील समीकरणांचा सखोल अभ्यास सुरू केला आहे. या समित्यांमध्ये जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार आणि पक्षनेते असतील. ते जिल्ह्यातील परिस्थिती, महायुतीच्या पक्षांची ताकद आणि जनतेतील प्रतिमा यांचा आढावा घेतील.
पुढील आठ दिवसांत जिल्हा समितीचा अहवाल राज्य समितीपुढे सादर केला जाईल. या अहवालाच्या आधारे महायुतीचे मुख्य नेते अंतिम निर्णय घेतील आणि वादग्रस्त जागांवरील उमेदवार निश्चित करतील.
राज्यात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार —
या कालावधीत निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांकडून प्रचार आणि रणनीतीचे नियोजन वेगाने सुरू झाले आहे.