महाराष्ट्रात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबविण्याला मंजुरी, ग्रामविकासासाठी दरवर्षी 290 कोटींची तरतूद

Published : Jul 29, 2025, 10:52 PM IST
maharashtra mahayuti mantrimandal shapathgrahan

सार

महाराष्ट्र सरकारने राज्यातील ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत, ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर रोख बक्षिसे दिली जातील.

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हाती घेतले आहे. हा उपक्रम आर्थिक वर्ष 2025-26 पासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य या चार स्तरांवर राबविला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली.

या अभियानासाठी दरवर्षी 290 कोटी 33 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. याअंतर्गत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यभरातील 1,902 पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

ग्रामपंचायतींसाठी पुरस्कार रचना

राज्यस्तरावर:

प्रथम क्रमांक – ₹5 कोटी

द्वितीय क्रमांक – ₹3 कोटी

तृतीय क्रमांक – ₹2 कोटी

विभागस्तरावर (प्रत्येक विभागातील 3 ग्रामपंचायती)

प्रथम – ₹1 कोटी

द्वितीय – ₹80 लाख

तृतीय – ₹60 लाख

जिल्हास्तरावर (34 जिल्हे, 102 ग्रामपंचायती)

प्रथम – ₹50 लाख

द्वितीय – ₹30 लाख

तृतीय – ₹20 लाख

तालुकास्तरावर (1,053 पुरस्कार)

प्रथम – ₹15 लाख

द्वितीय – ₹12 लाख

तृतीय – ₹8 लाख

विशेष पुरस्कार (702 ग्रामपंचायती) – प्रत्येकी ₹5 लाख

पंचायत समिती व जिल्हा परिषद पुरस्कार

पंचायत समिती (राज्यस्तर)

प्रथम – ₹2 कोटी

द्वितीय – ₹1.5 कोटी

तृतीय – ₹1.25 कोटी

विभागस्तरावर (18 पुरस्कार)

प्रथम – ₹1 कोटी

द्वितीय – ₹75 लाख

तृतीय – ₹60 लाख

जिल्हा परिषद (राज्यस्तर)

प्रथम – ₹5 कोटी

द्वितीय – ₹3 कोटी

तृतीय – ₹2 कोटी

अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ठोस यंत्रणा

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर ग्रामविकास व पंचायतराज मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 16 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन होणार आहे. 1 ऑगस्टपासून अभियानाची पूर्वतयारी सुरू होणार असून, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्वतंत्र मूल्यमापन समित्या नेमण्यात येणार आहेत. यासोबतच, विभाग, जिल्हा व पंचायत समिती स्तरावर संनियंत्रण आणि मूल्यमापन यंत्रणा सक्रिय केली जाणार आहे. प्रत्येक टप्प्याचे मूल्यमापन ठराविक कार्यपद्धती व वेळापत्रकानुसार केले जाईल.

अभियानातील सात मुख्य मूल्यांकन घटक

सुशासनयुक्त पंचायत

सक्षम पंचायत निर्माण

जलसमृद्ध आणि हरित गाव

स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रम

मनरेगा व अन्य योजनांची प्रभावी सांगड

ग्रामस्तरावरील संस्थांचे सक्षमीकरण व सामाजिक न्याय

लोकसहभाग, श्रमदान व जनचळवळींचा प्रभाव

या सात आधारांवर ग्रामपंचायतींचे गुणांकन करण्यात येईल आणि त्यानुसार पुरस्कारासाठी निवड होईल.

या अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित करणे हे एकमेव उद्दिष्ट नसून, ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन व लोकसहभागाच्या माध्यमातून पंचायत राज संस्थांना सक्षम बनवणे हे या अभियानाचे खरे ध्येय आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!