Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Published : Jul 30, 2026, 08:16 AM IST
New delhi rain pic

सार

महाराष्ट्रात पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशातच IMD कडून कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि रेड अलर्ट

हवामान विभागाने पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, बीड, परभणी, हिंगोली, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांसह स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर

सध्या ओडिशातील संबलपूरच्या वायव्येस कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) सक्रिय आहे. तसेच छत्तीसगड आणि ओडिशा परिसरातील वातावरणातील बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होत आहे. यामुळेच राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा

जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः नांदेडसह मराठवाड्यातील अनेक भागांत जोरदार पावसामुळे धान आणि इतर खरीप पिकांना मोठा फायदा होणार आहे. नाले आणि लहान ओढ्यांमध्येही पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे.

जलसाठे भरण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची गरज

राज्यात समाधानकारक पाऊस होत आहे. मात्र अनेक धरणे आणि जलाशयांतील पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

तुकाराम मुंढेंनी शालेय आहारात घातलं लक्ष, या जाहिराती बंद करण्याचे दिले आदेश
शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठा दिलासा; थकबाकीदार शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार