Maharashtra Weather : अवकाळीनंतर उष्णतेचा तडाखा! राज्यात ‘हिटवेव्ह’चा इशारा, पुढील 72 तास सतर्कतेचा सल्ला

Published : Apr 13, 2026, 09:19 AM IST
heatwave

सार

Maharashtra Weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर आता उष्णतेचा जोर वाढला आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून पुढील 72 तास नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोकणात दमट उकाडा, तर मध्य महाराष्ट्रात तापमान 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता उष्णतेचा पारा झपाट्याने वाढू लागला आहे. हवामान विभागाने काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून नागरिकांना पुढील 72 तास अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात दमट उकाड्याची शक्यता

कोकण विभागात आज हवामान कोरडे राहणार असले तरी समुद्रकिनारी भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान २४ ते २६ अंश, तर कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो.

मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा कहर

पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह सोलापूर या भागांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. सकाळी गारवा असला तरी दुपारनंतर तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मुंबईतील हवामानाचा अंदाज

मुंबईमध्ये आज तापमान सुमारे २८ अंश नोंदवले गेले असून कमाल तापमान ३० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सूर्योदय सकाळी ६:२२ वाजता, तर सूर्यास्त संध्याकाळी ६:५४ वाजता होईल. आर्द्रतेचे प्रमाण ५७% असल्याने दमट उकाडा जाणवणार आहे.

साप्ताहिक हवामान अंदाज

पुढील सात दिवसांत मुंबईतील कमाल तापमान ३० ते ३३ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

हवेची गुणवत्ता चिंताजनक

मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १५४ नोंदवला गेला असून तो ‘Poor’ श्रेणीत येतो. PM 2.5 आणि PM 10 चे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यासच बाहेर पडावे आणि मास्कचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! या दिवशी दक्षिण मुंबईत १८ तास पाणीपुरवठा बंद
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पालक गंभीर जखमी, दीड वर्षांच्या चिमुकल्याचा चमत्कारिक बचाव