Maharashtra Govt Subsidy: जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 19.22 लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 1,339 कोटीं चे मदत पॅकेज मंजूर केले आहे. या निर्णयामुळे 15.45 लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळणारय.
मुंबई: जुलै आणि ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 1,339 कोटी 49 लाख 25 हजार रुपयांच्या मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे 19 लाख 22 हजार 909 शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
29
शासन निर्णय काय सांगतो?
राज्य सरकारने नुकताच जारी केलेल्या आदेशानुसार, 15.45 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचं मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाला नुकसानाच्या प्रमाणानुसार निधी वाटप करण्यात आले आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले की, “या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे अनुदान त्यांना उभारी देईल. शासन त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं आहे.”
99
सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आधार ठरणार
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या प्रचंड नुकसानीची दखल घेत, राज्य सरकारने त्वरित 1,339 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे. हे पाऊल शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.