Ladki Bahin Yojana : या महिलांच्या खात्यात पुढचा हप्ता जमा होणार नाही, सरकारने आणला नवा नियम!

Published : Oct 01, 2025, 10:30 AM IST
Ladki Bahin Yojana

सार

Ladki Bahin Yojana मधील बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी सरकारने पती किंवा वडिलांची e-KYC अनिवार्य केली आहे. महिलेसोबत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नही तपासले जाणार असून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना अपात्र ठरवले जाईल.

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरघोस मतं मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे. या योजनेमुळे तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडल्याने सरकारने कठोर अटींची अंमलबजावणी सुरू केली आहे.

नवीन नियमाची अंमलबजावणी

लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या पती किंवा वडिलांची e-KYC अनिवार्य करण्यात आली आहे. जर महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे आणि नसेल तर वडिलांचे वार्षिक उत्पन्न तपासले जाईल. महिला आणि तिच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ नाकारला जाईल.

कठोर पडताळणीची प्रक्रिया

याआधी फक्त महिलांचे उत्पन्न तपासण्यात आले होते. मात्र, बहुतेक गृहिणींचे उत्पन्न अडीच लाखांखाली असल्याने अनेक पात्र ठरल्या. त्यामुळे आता कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी सरकारने नवे पाऊल उचलले आहे. यामुळे अनेक महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.

e-KYC प्रक्रिया कशी कराल?

लाभार्थींनी [ladakibahin.maharashtra.gov.in](https://ladakibahin.maharashtra.gov.in) या संकेतस्थळाला भेट देऊन e-KYC पूर्ण करायची आहे.

  • आधार क्रमांक, कॅप्चा टाकून OTP द्वारे प्रमाणीकरण करावे.
  • त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक व OTP टाकावा.
  • जात प्रवर्ग व घोषणा (Declaration) पूर्ण करून सबमिट करावे.
  • यशस्वी झाल्यास “e-KYC पडताळणी पूर्ण” असा संदेश मिळेल.

महत्वाचे डिक्लेरेशन

लाभार्थ्याने जाहीर करावे की –

1. कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक नाही.

2. कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला लाभ घेत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अपघाताची बातमी वाचून डोळ्यापुढं येतील अंधाऱ्या, गोंदियातील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; ४० पेक्षा जास्त प्रवासी जखमी
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ