या विशेष रेल्वेगाड्यांना पुढील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सवर्धा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
महाशिवरात्रीच्या काळात मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी या विशेष गाड्या अत्यंत उपयुक्त ठरणार असून, प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.