युद्ध पेटलं पण शेतकरी वाचला! JNPA बंदरात अडकलेल्या फळ-भाजीपाल्यासाठी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'

Published : Mar 11, 2026, 07:04 AM IST
Maharashtra CM Devendra Fadnavis

सार

मध्य पूर्वेतील युद्धामुळे जेएनपीए बंदरात अडकलेल्या फळे आणि भाजीपाला निर्यातीला मोठा फटका बसला आहे. यावर तोडगा म्हणून, सरकारने अडकलेल्या कंटेनर्सवरील साठवणूक शुल्कात १००% आणि वीज शुल्कात ८०% सवलत जाहीर करून निर्यातदारांना आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

मुंबई: मध्य पूर्वेतील युद्ध आणि भूराजकीय तणावामुळे आखाती देशांकडे (GCC) जाणारी फळे आणि भाजीपाल्याची निर्यात संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील शेतकऱ्यांचे आणि निर्यातदारांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाद्वारे (JNPA) अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएनपीए बंदरात अडकून पडलेल्या कंटेनर्सवरील विविध शुल्कांत मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे.

सरकारचा 'मास्टरस्ट्रोक', काय आहेत सवलती?

निर्यातदारांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी खालीलप्रमाणे सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

साठवणूक शुल्क (Storage Charges): अडकलेल्या कंटेनर्सवरील साठवणूक शुल्क १००% माफ करण्यात आले आहे.

विद्युत जोडणी शुल्क (Electricity Charges): शीतगृह (Reefer) कंटेनर्ससाठी लागणाऱ्या वीज शुल्कात ८०% सवलत देण्यात आली आहे.

अतिरिक्त जागा: नवीन जहाज उपलब्ध होईपर्यंत माल सुरक्षित ठेवण्यासाठी टर्मिनलमध्ये अतिरिक्त जागा उपलब्ध करून दिली आहे.

कालावधी: ही सवलत २८ फेब्रुवारी २०२६ ते १४ मार्च २०२६ या १५ दिवसांच्या कालावधीसाठी लागू असेल.

शेतकऱ्यांचे २ लाखांचे नुकसान टळणार!

युद्धामुळे जहाजे उपलब्ध नसल्याने प्रति कंटेनर, प्रति आठवडा सुमारे २ लाख रुपयांचा अतिरिक्त दंड आणि खर्च येत होता. सध्या जेएनपीए येथे २५० आणि मुंद्रा बंदरात १५० कंटेनर्स अडकले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे निर्यातदारांना कोट्यवधी रुपयांचा दिलासा मिळणार असून, त्याचा थेट फायदा फळ-भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना होईल.

केंद्र व राज्य सरकारचा समन्वय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, पणन मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि पीयूष गोयल यांच्याकडे या संदर्भात तातडीने पाठपुरावा केला होता. केंद्राने याला सकारात्मक प्रतिसाद देत सीमाशुल्क विभाग आणि बंदर प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाची टीप: ही सवलत प्रामुख्याने २८ फेब्रुवारी रोजी टर्मिनलवर असलेल्या आणि ८ मार्च रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत नोंदणी झालेल्या कंटेनर्सना लागू असेल.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Weather Update: महाराष्ट्राचा पारा चढला! ५ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; अकोल्यासह कोकणात उन्हाचा कडाका वाढणार
तुमच्या गावाचा पैसा जातोय कुठे? ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला, आता एका क्लिकवर मोबाईलवर पाहा!