दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षा देतात. त्यामुळे परीक्षा केंद्रांची आखणी, उत्तरपत्रिकांचे व्यवस्थापन, शिक्षक व निरीक्षकांची नियुक्ती, आणि अभ्यासाचे नियोजन या साऱ्या गोष्टी वेळेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग वेळापत्रक आधीच जाहीर करतो.
यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना नियोजनपूर्वक अभ्यास करता येतो, शाळांना सराव परीक्षा, मार्गदर्शन सत्रं आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नीट वेळ देता येतो.