पुणे: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी जमीन व्यवहार आता अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि वादमुक्त होणार आहेत. महसूल विभागाने एक मोलाचा निर्णय घेतला असून, यामुळे जमिनीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहेत.
‘आधी मोजणी मग खरेदीखत नंतर फेरफार’ या त्रिसूत्री पद्धतीने आता व्यवहार राबवले जाणार आहेत, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.