Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पूजा करणारे उगले दांपत्य कोण?, जाणून घ्या त्यांच्या भक्तीमय प्रवासाबद्दल

Published : Jul 06, 2025, 04:27 AM ISTUpdated : Jul 06, 2025, 04:37 AM IST
vitthal mahapuja cm fadnavis

सार

Ashadhi Ekadashi : नाशिक जिल्ह्यातील जातेगावच्या उगले दांपत्याला यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली.

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर नगरीत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली असताना, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांना यंदाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या साक्षीने, उगले दांपत्याने आज विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याचा सन्मान मिळवला तो एक अत्यंत गौरवाचा आणि अध्यात्मिक तेजाचा क्षण.

उगले दांपत्याची १२ वर्षांची अखंड वारी, श्रद्धेचा प्रवास

कैलास उगले हे एक सर्वसामान्य शेतकरी. पण त्यांचा भक्तिभाव असामान्य. गेल्या १२ वर्षांपासून त्यांनी दरवर्षी आषाढी वारीत भाग घेतला आहे. त्यांची आणि त्यांच्या पत्नीची विठ्ठलभक्ती, वारकरी संप्रदायाशी निष्ठा आणि सेवा हीच त्यांची खरी ओळख झाली आहे. ग्रामीण भागात राहूनही त्यांनी आपल्या साधेपणातून आणि भक्तिभावातून लाखो वारकऱ्यांच्या मनात स्थान मिळवलं.

शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांसोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून सहभाग

आज पहाटे २.३० वाजता पार पडलेल्या शासकीय महापूजेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्यात आली. याच पूजेत उगले दांपत्य वारकरी प्रतिनिधी म्हणून सहभागी झालं. हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिकदृष्ट्या देखील एक मोठा गौरव आहे.

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील शासकीय महापूजेचा पहा व्हिडिओ

 

एक प्रेरणादायी उदाहरण

उगले दांपत्याची ही निवड ग्रामीण भागातील सामान्य शेतकरीसुद्धा आपल्या श्रद्धेच्या आणि निष्ठेच्या जोरावर राज्यपातळीवर गौरव मिळवू शकतो, हे दाखवून देणारी आहे. शेतमजुरी करत करत, विठ्ठलभक्तीचे बीज मनात खोलवर रुजवत त्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

‘माऊली’च्या कृपेचा प्रसाद

पंढरपूरची ही वारी प्रत्येक वारकऱ्यासाठी खास असते, पण उगले कुटुंबासाठी यावर्षी ती संस्मरणीय ठरली. भक्ती, श्रद्धा आणि साधेपणाच्या बळावर त्यांनी विठ्ठलाच्या चरणी स्थान मिळवलं, आणि हेच त्यांच्या जीवनातील सर्वात मोठं यश ठरलं.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!