ही गाडी पूर्णपणे अनारक्षित असल्यामुळे कामगार, विद्यार्थी तसेच सामान्य प्रवाशांना सहज आणि परवडणाऱ्या दरात प्रवास करता येणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि इतर तपशीलांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.